RENA
कायूम
तांग्रीकुलीयेच
धनगराचा
कुत्रा
STAR
कायूम तांग्रीकुलीयेच
धनगराचा
अनुवाद : अनिल हवालदार
चित्रे : एदुआर्द झान्यान्स्की
प्रगती प्रकाशन , मॉस्को
TORE
ALLED
कुत्रा
700
SHERS
S
US
2
OR
MOBI
धनगराचा कुत्रा
तो धनगर त्या वाळवंटात एकटाच उभा होता . त्याचा मदतनीस शेजारच्या खेड्यातून
बाया -पिण्याच्या वस्तूंचा साठा आणायला गेला होता . जोपर्यंत त्या म्हाताऱ्या कझाख धनगरापाशी
त्याची विश्वासू बंदूक होती आणि इमानी कुत्रा होता , तोपर्यंत त्याला वाळवंटाची भीती वाटत
नव्हती . लांडग्यांच्या कोणत्याही हल्ल्याला त्यांनी परतवून लावले असते .
आपल्या वाकड्या काठीवर रेलून तो धनगर विचार करीत उभा होता , तोच टेकडीपलिकडे
वेटोळेदार धुराचा लोट त्याच्या नजरेला पडला . जणू एखादा प्रचंड राक्षस चिलीम ओढत असावा
असे त्या धुराच्या लोटाकडे पाहून वाटत होते .
सकाळी धुळीचं वादळ होणार , धनगराचा इशारा खरा ठरणार , " काहीसा चिंताक्रांत
होत तो स्वतःशी म्हणाला ..
मुळीच वेळ न गमावता त्याने आपल्या मेंढयांच्या कळपाला वाऱ्याच्या झोतांपासून दूर ,
टेकडीच्या निवाऱ्याला नेले . दरम्यान त्याचा कुत्रा मेंढयांना ताब्यात राखायला मागेपुढे धावत
होता . एकदा का मेंढ्यांमध्ये घबराट माजली की , त्यांना आवरणे कठीण जाते . त्या मुंड्या
जमिनीला टेकवून वाऱ्याबरोबर चारी दिशांना भरकटत जातात .
दिमाखदार उंटाचे तसे नसते . ऐन वादळात तो ताठ मानेने धीराने वाटचाल करत असतो .
- लौकरच ते वाळूचे वादळ त्या धनगरापर्यंत आणि त्याच्या मेंढयांपर्यंत पोचले . वारा घोंघावत
होता , काळोख पसरला होता , धुळीने सूर्याला झाकून टाकले होते आणि धनगराला दोन
पावलांवरची वाटसुद्धा दिसेनाशी झाली होती .
__ वादळ सूं सूं भणाणत होते तेव्हा आपल्या भल्या मोठ्या अग्यात स्वत : ला गरफटून घेऊन
तो धनगर मेंढ्याच्या कळपाशी मुकाट बसून होता . आकाशात विजांचा कडकडाट वाजत होता ,
G
Das
मेंढया घाबरून वाळवंटात सैरावैरा धावत होत्या . धनगराने त्यांच्या मागे धावायचा प्रयत्न केला ,
पण जोरदार वान्यांनी त्याला क्षणात भुईसपाट पाडले . त्याच्या नाका-तोंडात , डोळ्यात आणि
कानात वाळूच वाळू भरली . वाळूचे कण त्याच्या दातांमध्ये चरचरा रगडले जाऊ लागले . वादळ
संपेपर्यंत मुकाट पडून राहण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता . त्या अंधारात आंधळ्याप्रमाणे चाचपडत
फिरणे त्याला शक्य नव्हते .
सकाळच्या सुमाराला वाऱ्याचा जोर कमी झाला आणि आपल्या वाळूच्या आडोशामधून
तो धनगर सरपटत बाहेर आला . पण त्याने भोवती नजर टाकली तेव्हा तिथे कुणाचाच पत्ता
नव्हता – ना त्याच्या मेंढ्यांचा ना कुत्र्याचा ! जणू वादळाने त्यांना गिळून टाकले होते .
वाळवंट धुंडाळीत असताना त्या धनगराला एक छोटी पितळेची वस्तू सापडली . मेंढयांच्या
कळपाचा पुढारी असलेल्या म्हातान्या बकऱ्याच्या गळ्यातली ती घंटा होती . त्या सेर्का नांवाच्या
म्हातान्या बकऱ्याच्या गळ्यातली घंटा हरवली होती याचा अर्थ पुढे दुर्दैव वाढून ठेवलेले होते .
कारण त्या घंटीचा आवाज अनेक मैलपर्यंत ऐकू येत असे आणि त्या आवाजाच्या दिशेने धनगराला
आपल्या कळपाला हुडकून काढता येत असे . आता तो आपल्या मेंढया कशा शोधणार ? गवताच्या
गंजीमधून सुई हुडकून काढण्याइतकेच ते काम अवघड होते . . .
लगबगीने तो धनगर खेड्यात परत आला आणि लोकांना गोळा करून मेंढया शोधायला चार
दिवस व चार रात्री त्यांनी वाळवंट पालथे घातले . . . अखेर पाचव्या दिवशी त्यांना शोध लागला !
त्या मेंढ्या कुठे होत्या ठाऊक आहे ? कुरणापासून तब्बल दोनशे मैल दूर !
एका बिनवापरातल्या पाण्याच्या विहीरीपाशी कळप शांतपणे चरत
होता . सर्व मेंढे आणि मेंढया सुखरूप होत्या . आणि त्याचे श्रेय त्या इमानी
कुत्र्याला होते . गेले पाच दिवस तो कुत्रा भूक आणि तहान सहन करीत
होता . पण त्याने त्या मेंढ्यांपासून आपली जागा सोडली नव्हती व आपल्या
मालकाची वाट पहात तो मेंढ्यांची राखण करीत राहिला .
R
SELETE
ANTILIBASY
।
RS
GSSSPORTS
काws ETTER
STARTEDLE
AHMEEMENBAESTHE
अकबाय
आता मी तुम्हाला अक्बाय नांवाच्या वाळवंटातल्या आणखी एका कुत्र्याची गोष्ट सांगणार
आहे . वाळूच्या टेकड्यांमध्येच , आपल्या मालकाच्या मेंढयांची राखण करीत तो लहानाचा मोठा
जारमा . बाळवंटातल्या लांडग्यांना त्याची मोठी धास्ती बसली होती . शूर अक्बायला कुणीही जोड
काहीवेळा लांडग्यांच्या कळपाची धूर्त पुढारीण आपल्या दोन टोळ्या बनबायची . छोटया
टोळीला ती राखणदार कुत्र्यावर सरळ सरळ हल्ला करायला पाठवायची आणि त्याचवेळी लांडग्यांची
मोटी टोली तिच्या पुढारीपणाखाली मेंढ्यांच्या कळपाच्या पिछाडीकडून धाड घालायची . अशा
फनोने लाडन्यांचा कळप अनेक मेंढ्यांना ठार मारायचा आणि आपली लूट पळवायचा .
सम अनुभवी अक्बायला लांडग्यांच्या युक्त्या माहीत झाल्या होत्या . आणि त्याला आपल्या
मैडचाही माहीत होत्या . कोणतीही युक्ती त्याला त्याच्या जागेपासून ढळवू शकत नव्हती .
परंतु आता हा धनगरी कुत्रा म्हातारा होत चालला होता . लौकरच अशी वेळ येऊन ठेपली
की , त्याच्या मालकाला नाइलाजाने त्याला खेड्यात परत पाठवणे भाग पडले . या म्हातान्या
कुयाने आपले आयुष्यातले अखेरचे दिवस निवांतपणे झाडांच्या थंडगार सावलीत , मऊ मऊ
यादानावर बसून काढावेत अशी त्याच्या मालकाची इच्छा होती .
___ वाठवंडात जायला निघण्यापूर्वी त्या कुत्र्याच्या मालकाने - चारी आजोबाने -- अक्बायला
वाजळीने बांधले आणि कमीत कमी एक दिवस त्याला मोकळा सोडू नये असा हुकूम दिला .
महामाजे तो धनगर खूप दूर अंतरापर्यंत गेला असता आणि त्याचा पाठलाग करीत जाणे कुत्र्याला
शाक्य झाले नसते . साहजिकच सबंध दिवसभर आणि अर्ध्या रात्रीपर्यंत म्हातारा अक्बाय भुंकत
साहिला आणि साखळीला हिसके देत राहिला . ज्या क्षणी त्याला साखळीपासून मोकळे करण्यात
आले , त्या अणाला पुढ्यातल्या थाळीतल्या खाण्याच्या पदार्थांकडे ढुंकूनही न पाहता त्याने
वाळवंटाच्या दिशेने धाव घेतली . त्याच्या आयुष्यातला तो अत्यंत खडतर प्रवास होता . रणरणत्या
वाळवंटामधून पाण्याविना किंवा सोबतीच्या मदतीविना त्याला दोनशे मैलांहून जास्त अंतर
काटायचे होते .
अखेरीस तो कुरणाजवळ पोचला तेव्हा थंडगार पाण्याशेजारी अक्बाय थकून कोसळला
आणि घटघटा घटघटा पाणी पीत राहिला . .. मग थकलेली मुंडी खाली झुकवून तो खरडत
खरडत आपल्या घराशी विश्रांतीला गेला . पण त्यापूर्वी त्याने नव्या तरुण राखणदार कुत्र्याला
तेथून दूर हाकलले .
आपल्या जुन्या मित्राला पाहताच चारी आजोबांना डोळ्यातले अश्रू आवरणे कठीण झाले .
ते अक्बायजवळ गेले , त्याच्या शेजारी बसले आणि हळुवारपणे त्याचा कान खाजवीत त्यांनी
पुटपुटत क्षमा मागितली .
आपल्या मालकाची जणू हजेरी घ्यावी अशा त-हेने म्हातारा
अक्बाय प्रथम तक्रारीच्या सुरात केकाटला , पण लौकरच त्याचे शेपूट
हलू लागले . त्याचे स्वागत केल्याबद्दलचा व तो पुन्हा तेथे हवा होता
हे समजल्याचा आनंद , हलणारे शेपूट दाखवीत होते .
गुपित
एकदा मी चारी- आगा आणि अक्बाय यांच्या भेटीला त्यांच्या वाळवंटातल्या मुक्कामी
मोल्लो होतो . म्हाताऱ्या धनगराने मला थोडे खायला दिले आणि मडके भरून ताजा हिरव्या पत्तीचा
चहा दिला . मग मला म्हणाले :
“ माझ्या पोरा , जर तुला धनगर व्हायचं असेल तर कामाचा अनुभव घेतला पाहिजे .
दिसायला हा मेंढ्या राखायचा धंदा सोपा असला , तरी तो शिकायला आयुष्य पुरत नाही , हे
माझे शब्द लक्षात ठेव . तेव्हा मी तुला पहिला धडा शिकवतो . तो उंट पाहिलास ? त्याच्या
साटोबर मी दोन बुधले लटकावले आहेत . त्या उंटाला विहीरीपर्यंत घेऊन जा आणि पोरा ,
माझ्यासाठी तेवढं पाणी भरून घेऊन ये . ते पाणी चहाला खूप ताजं असतं .
पण एक गोष्ट सांगतो . वाटेत जर तुझ्या उंटानं गवत चरायला किंवा आडवाटेला भटकायला
मुसुरुवात केली , तर त्याला तसं करूं दे . त्याला मारू नको आणि त्याच्यावरून खाली उतरू नको .
कोल्यातीला अकबायला घेऊन जाऊ शकतोस . "
तर असे आम्ही तिघे निघालो : अक्बाय , उंट आणि मी .
मी चाललो , चाललो , पण विहीरीचा पत्ता नव्हता . पुढे मला नंतर समजले की , ती विहीर
ताबाट बारा मैल अंतरावर होती . मुलाच्या दृष्टीने हे अंतर कमी नव्हते . माझा उंट रमतगमत
चालला होता , गवत चघळत होता , सगळ्या वाळूच्या टेकड्यांना वळसे घालत होता . हा सर्व
बेट अक्वाय बिळातल्या उंदरांचा पाठलाग करीत होता आणि सशांची घाबरगुंडी उडवीत होता .
काही वेळानंतर आम्हाला एक म्हातारा वाटसरू भेटला .
ए पोरा , " त्याने हाक मारली , " अशा वेळेला कुठं चाललायस ? लौकरच अंधार पडेल . "
मी माझ्या कामगिरीची त्याला माहिती दिली तेव्हा तो ओरडला .
" काय ? संध्याकाळची वेळ जवळ आली असताना वाळवंटात जाण्यचा धोका पत्करतोस ?
तशी विहीर फारशी लांब नाही म्हणा ! "
असे म्हणून त्याने माझ्या उंटाचा लगाम हाती पकडला . आम्हाला मागे वळवण्याचा त्याचा
इरादा होता . पण अक्बायने अचानक त्याची विजार मागल्या बाजूने तोंडात पकडली .
“ अक्बाय , सोड त्याला , " मी रागाने ओरडलो .
पण त्या हट्टी कुत्र्याने माझे मुळीच ऐकले नाही ; जेव्हा वाटसरूने लगाम सोडून दिला
तेव्हाच अक्बायने त्याची विजार सोडली .
जणू काही घडलेच नाही अशा थाटात आमची उंटाची स्वारी पुढे निघाली .
" त्याला जोरात पिटाळ " म्हातारा वाटसरू ओरडला . “ लौकरच रात्र पडेल ; तू वाळवंटात
रस्ता चुकशील . "
" मी माझ्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न करतो , " मी उत्तरादाखल ओरडलो . पण प्रत्यक्षात
मात्र चारी आजोबांच्या आज्ञा मी पाळल्या . उंटाला मारायचे नाही आणि उंटावरून खाली उतरायचे
नाही .
अशा रीतीने मी माझा शब्द पाळला आणि उंटाला मनमोकळे चालू दिले . आणि आनंदाची
बाब म्हणजे आम्ही लौकरच विहीरीजवळ पोचलो . वाळवंटातल्या पाणथळ जागेच्या आम्ही जवळ
पोचलो तसे चारी बाजूंनी कुत्री भुंकत आमच्या अंगावर चालून आली . पण आमचा वास
ओळखताच , जण जुन्या मित्रांचे स्वागत करावे त्याप्रमाणे त्यांनी आपल्या शेपट्या हलवायला
सुरुवात केली . कुत्र्यांपाठोपाठ एक मुलगा तेथे आला . माझ्यापेक्षा तो सुमारे पाच वर्षांनी मोठा
असावा . अर्थात मी माझ्या उंटावर मोठ्या दिमाखात बसून राहिलो होतो . जणू त्याला दाखवून
देत होतो – “ माझ्याकडं वर पहा . मी वाळवंट ओलांडून आलोय , माहीत आहे ? "
त्याने किंचित ताठपणेच मान झुकवली आणि माझ्या उंटाला गुडघ्यांवर खाली बसवले .
आमचे बुधले पाण्याने भरले आणि हाताने झटकून निरोप दिला . जणू मी म्हणजे उंटाच्या
पाठीवरची एक क्षुल्लक माशी होतो !
माझा उंट चटकन उठला आणि त्याने परत वाळवंटाचा रस्ता धरला . आता मात्र तो कुठेही
थांबत नव्हता . भुलावण्या देणाऱ्या गवताकडे दुर्लक्ष करून त्याने वाळूच्या टेकड्यांमधून तडक
घरची वाट धरली . आणि राखणदार कुत्र्याप्रमाणे त्याच्या शेजारून अक्बाय धावत होता . उंदरांना
पकडण्याचे विचार त्याच्या डोक्यातून आता पळाले होते . आणि रात्र पडण्यापूर्वीच आम्ही चारी
आजोबांकडे परतलो .
“ शाब्बास पोरा ! छान काम पार पाडलंस ! अक्बाय , शहाणा कुत्रा आहेस ! " चारी
आजोबा म्हणाले .
___ अशा रीतीने काम चालले होते . शरद ऋतूच्या अखेरच्या दिवसांपर्यंत मी विहीरीतून पाणी
आणायचे काम करीत होतो . आणि जेव्हा मी घरी परत
जायला निघालो तेव्हा कुठे मला ते गुपित समजले .
मी तेथे येण्यापूर्वी , अक्बाय आणि तो उंट असे
दोघेच पाणी आणण्याचे काम करीत . . . चारी
आजोबांनी त्यांना शिकवले होते !
INTERNOORNAL
PRASTRISANE
RSS
PRODE
HERE
AAAAFER
SARGAMAcid
OraSHREE
SNETAITIES Antop
CAYAN
STAudi
धनगराची नजर
एकदा भूगोलशास्त्रज्ञांचा एक छोटा काफला काराकुमचे काळे वाळवंट ओलांडत चालला
होता . त्या लोकांना अख्खा पंधरवडा त्या वाळवंटामधून अगदी एकाकी कंठावा लागला होता .
सोबतीला फक्त वाळू आणि उंट . अखेरीस ते किझील्यार नांवाच्या धनगरवस्तीवर जाऊन पोचले .
या वस्तीत पाच धनगरांची घरे होती . त्यांपैकी तीन कझाख होते , दोन तुर्कमेनी होते .
पतेक नांवाच्या प्रसिद्ध वाळवंटी राखीव अभयारण्याकडे ते भूगोलशास्त्रज्ञ चालले होते .
यामा अचानक त्या धनगरांच्या मेजवानीच्या वेळी तेथे हजर राहण्याचा योग त्यांना लाभला . अशा
मेजवानोला धनगर लोक तोई म्हणतात . त्या दमल्याभागल्या प्रवाशांचे स्वागत करून त्यांना
आपत्ते मानून खाऊ-पिऊ घालण्यात त्या अतिथीप्रेमी धनगरांना साहजिकच खूप आनंद झाला .
चरबीयुक्त मटणाच्या शूर्पा ( मटणाचे सूप ) नांवाच्या सूपनंतर बेशबार्माक ( मटणाचा
सादा ) या शेवयांसकट शिजवलेल्या मटणाच्या पदार्थावर मंडळींनी यथेच्छ ताव मारला व फुरके
मारून चहा पीत गप्पागोष्टी चालू झाल्या .
त्यावेळी प्रत्येकाच्या मनात दुष्काळाच्या भीतीने ठाण मांडले होते . वसंत ऋतू संपत आला
होता तरी अजून पावसाचा पत्ता नव्हता . गवत सुकून भाजून गेले होते आणि त्याला मक्याचा
फिकट भरा रंग आला होता . जनावरांना खायला काय घालायचे ?
गर्भार उंटिणींसारखं कण्हायचं थांबवा , " एक भरडा आवाज उमटला . “ मेजवानी संपायच्या
वोपर्यंत तुम्ही सारे पावसानं भिजून ओलेचिप्प व्हाल ! "
तो वारी आजोबांचा आवाज होता . रात्रीसाठी आपल्या मेंढयांना कोंडवाड्यात घालून
आता ते आपल्या रंगीबेरंगी दुलईवर येऊन बसत होते .
पण हे तुम्हाला कसं समजलं ? " एका भूगोल शास्त्रज्ञाने विचारले . “ आकाश तर अगदी
LADOOG
" अरे माझ्या उंटाच्या बछड्या ! " म्हातारा धनगर हसून म्हणाला . " तुम्ही लोक आज इथं
मेरमार हे काल मला जेवढं पक्कं माहीत होतं , तेवढंच आता पाऊस पडणार हे मला ठाम माहीत
" चारी- आगा , तुम्ही कोड्यांची भाषा बोलताय . "
" मेंढीच्या ढुंगणाला शेपटी असते हे सांगण्याएवढं माझं बोलणं साधं- सोपं आहे . " आपल्या
प्रत्येक बोटावरची मटणाची चरबी चाटून पुसून खात म्हातारबाबा बोलले . " मेजबानीला यायला
उशीर होईल या भीतीनं तुमच्या वाटखुणांवरून मी माझ्या मेंढयांना पिटाळत आणलं . ऐका
माझ्या कोकरांनो , तुम्ही शाळा -कॉलेजात काही थोडी वर्ष घालवलीत , तर या वाळवंटात शिकण्यात
माझं अख्खं आयुष्य गेलंय . ही काळी वाळू माझी शिक्षक . दहा वर्षांपूर्वी तुम्हा लोकांना मी माझा
सर्वांत चांगला उंट विकला होता आणि त्यानंच तुम्हाला आज इथं आणलं . त्याच्या पाऊल खुणा मी
कुठंही ओळखतो . चेहऱ्यावरून माणसाचं वर्णन करता येतं तसं पावलांच्या खुणांवरून जनावर
ओळखता येतं . ”
__ _ “ ठीक आहे चारी- आगा , " भूगोलशास्त्रज्ञ म्हणाला , " तुमचं दुसरं रहस्य सांगा . लौकरच
पाऊस पडेल असं कोणत्या आधारावर तुम्ही एवढया खात्रीनं सांगता ? " ।
“ आता नक्की पाऊस पडेल . येताना वाटेत माझी मेंढरं जणू वान्याला तोंड द्यावं तशी
एकमेकांजवळ गर्दी करून आणि मुड्या भुईला टेकवून उभी राहिली . ही पावसाची हमखास
खूण आहे . "
तरीही माणसे सावध होती . सूर्य नेहमीप्रमाणेच निर्दयपणे भाजून काढत होता . आकाशात
एकही ढग दिसत नव्हता किंवा त्या धुळकट वाळवंटात वाऱ्याची एकही झुळूक वहात नव्हती .
पण म्हातान्या धनगराचे बोलणे खरे ठरले . मेजवानी संपायच्या आतच वाळूवरून जोरदार वारे
वहायला सुरुवात झाली व आकाशात वादळी ढग जमा झाले .
आणि पावसाच्या सरी कोसळू लागल्या .
- भूगोलशास्त्रज्ञांचा काफला जेव्हा रेपेतेकला जायला निघाला ,
तेव्हा त्यांचे पाय ओल्या वाळूमध्ये रुतत होते आणि वाळवंटातल्या
गवताच्या ताजेपणाकडे व डोळ्यांदेखत उमललेल्या फुलांकडे त्यांचे डोळे
नवलाईने पहात होते .
नदीच्या वाळूसारखा त्या ओल्या वाळूला ताजा वास येत होता .
खरा मित्र
त्या उंटाचे नांव होते बायोर- होल्म . म्हणजे पर्वताएवढा प्रचंड तो उंट खरोखरच खूप
मोबा आणि ताकदवान होता .
जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा त्याच्या मालकाने त्याला टाकून दिले नाही किंवा त्याला
जीनामाचाही जुपले नाही . त्या इमानी जुन्या सेवकाला निवांतपणे राहू देण्यात आले . पण त्या
बाटाच्या डोक्यात मात्र दुसरेच विचार होते . माणसाच्या दयाळूपणाची , त्याच्या प्रेमळ थोपटण्याची ,
लाडक्या शब्दाची , भल्या मोठ्या केसाळ कानांना गंमतीने त्याच्याकडून ओढून घेण्याची त्या उंटाला
सवय लागली होती . नुसते गप्प बसून राहणे त्याला अजिबात आवडत नव्हते .
एक दिवस एक छोटा मुलगा हातात भाकरीचा तुकडा घेऊन बायीर-होल्मजवळ आला .
" माझं नांव मुराद , " तो उंटाला म्हणाला . “ आणि तुझं नांव बायीर आहे ना ? चल ,
आमामा मित्र होऊ या . "
मुराद आपल्या मित्राला भेटायला रोज येऊ लागला . येताना तो उंटासाठी खायला घेऊन
पाई आणि त्याला प्रेमाने थोपटे . दरम्यान , आपल्या छोटया मित्राला खूष करण्यासाठी तो म्हातारा
बाट जमिनीवर आडवा पसरून राही . काही वेळा तर आपल्या टेंगळेदार पाठीवरून त्याला फिरवून
मे महिन्याचे शेवटचे दिवस होते . वाळवंटातले गवत एव्हाना सुकून गेले होते . सर्पण गोळा
कालाबाला मुराद बायीरला घेऊन गेला होता . वाळवंटातल्या विरळ झुडुपांच्या काटक्यांच्या त्या
सोमावाकड्या बांधलेल्या मोळ्या मुळीच जड नव्हत्या , पण तो उंट त्यांना एवढ्या दिमाखाने
योजन चालला होता की , जणू तो पूर्वेमधले भारी किंमतीचे खजिनेच वाहून नेत होता . छाती
पुढे काडून चालताना तो दाखवू पहात होता की , तो पुन्हा काम करीत होता आणि लोकांना
सादात करोत होता .
अशाच एका भटकंतीमध्ये तो मुलगा आणि उंट एका दूरच्या झाडीजवळ पोचले . तेथे
वाळलेल्या काटक्या होत्या . मुरादने भरपूर सर्पण गोळा केले . माध्यान्हीच्या तापत्या उन्हात तो
मजेने काम करीत होता . पण लौकरच त्याला तहान लागली आणि उष्मा जाणवू लागला . तेव्हा
त्याला आठवण झाली की , पाण्याचा खुजा तो घरीच विसरला होता . आपल्या विसरभोळेपणाची
त्याला लाज वाटली . घर खूप दूर असल्याने जवळच्याच जुन्या ताकुर मधून पाणी घेणे योग्य
उरेल असे त्याला वाटले . ताकुर म्हणजे आटलेल्या तळ्याच्या जागी सूर्याच्या कडक उन्हाने भाजून
निघालेला वाळूचा बधारा . ताकुर मध्ये पाण्याचे छोटे छोटे ओहोळ असणार याची मुरादला खात्री
होती .
दुरून त्याला सूर्यप्रकाशात ते आरशासारखे चमकत असलेले दिसत होते . मातीतल्या मिठामुळे
त्याचा पृष्ठभाग पांढराशुभ्र दिसत होता .
प्रथम बायीरने वाळूच्या बांधाच्या दिशेने ठामपणे पाऊल टाकले , पण तो नंतर एकदम मागे
सरला आणि रेसभरही पुढे सरकेना .
" चल बायीर , " मुराद त्याला रागावून म्हणाला . " इथून आपलं घर खूप लांब आहे .
पाणी मिळालं नाही तर आपल्या दोघांचेही फार हाल होतील . "
उंटाच्या पाठीवरून उतरून तो पाण्याच्या दिशेने धावला असता , पण बायीरने त्याचा
सदरा आपल्या दातांमध्ये गच्च पकडून धरला .
“ आज काय तुला गंमत करायची लहर आलीय ! " मुराद उद्गारला . “ मला फक्त पाणी
प्यायचंय . भयंकर गरम होतंय . "
बायीरने त्याचे ऐकले नाही .
भाजलेल्या पिठाप्रमाणे पायाखालची वाळू मऊ भुसभुशीत झालेली होती . पण आपली तहान
कशी लौकर भागवायची एवढ्याच विचाराने त्या मुलाला घेरले होते . पाण्याची विहीर डझनभर
पावलांच्या अंतरावर होती . बायीरच्या पकडीतून हिसका मारून त्याने स्वतःला सोडवून घेतले
आणि जमिनीवर उडी मारली . . . आणि ताबडतोब गुडघ्यापर्यंत त्याचे पाय बाळूत रुतले . त्याने
खूप जोराने प्रयत्न केले , पण मिठी घालणाऱ्या वाळूमधून त्याला आपले पाय वर खेचता येईनात .
आपण हळूहळू वाळूत बुडत चाललो आहोत ही भयंकर जाणीव त्या मुलाला झाली . वाळू त्याला
खाली खाली ओढत होती . आपल्या पोटावर पालथे पडायचा त्याने प्रयत्न केला , पण ती धोकेबाज
वाळू एकदम बाजूला सरली आणि तिच्या फटींमधून पाणी झिरपले .
" बायीर ss ” घाबरून मुराद ओरडला .
त्या म्हाताऱ्या उंटाला या संकटाची आधीच कल्पना होती . सरकणाऱ्या वाळूवरून त्याने
लटपटती पावले टाकली , मग आपल्या पोटावर तो खाली बसला आणि धडपडणाऱ्या मुलाच्या
दिशेने सरपटत सरकला .
उंटाच्या वजनाखाली वाळू खाली दबत चालली होती , तरी बायीर जास्तीत जास्त मुरादच्या
जवळ सरकला , आपल्या बळकट दातांमध्ये त्याने त्याचा सदरा धरला आणि जोरात झटका देऊन
त्याने मुरादला त्या वाळूच्या पकडीतून मोकळे केले . ऐन मोक्याच्या वेळी मुराद त्या दलदली
वाळूमधून निसटला आणि भस्सदिशी तो खड्डा वाळूने बुजून गेला .
मरादने आपल्या मित्राला मिठी मारली . त्या उंटाच्या विचित्र डोक्याला कृतज्ञतेने त्याने
आपले डोके घासले .
“ बायीर , मला क्षमा कर , " आपल्या शहाण्या म्हातान्या मित्राची त्याने विनवणी केली .
" आता इथून लौकरात लौकर निसटून जाऊ या . "
उंटाने मुरादकडे कष्टी , प्रेमळ नजरेने पाहिले , पण तो जागचा हलला नाही . तेव्हा कुठे
मुरादच्या ध्यानात आले की , वाळूने उंटाला मिठी घातली होती आणि लौकरच तिने
बायीरला सबंध गिळून टाकले असते .
" बायीर , अरे मित्रा घाबरू नको . जरा दम धर ! ” मुराद ओरडला आणि चपळाईने
त्याने उंटाच्या पाठीवरची वाळक्या काटक्यांची मोळी सोडवून त्या काटक्या भराभरा उंटाच्या
पोटावाली घातल्या . मागे वळूनही न पाहता , घरून मदत आणण्यासाठी जेवढ्या वेगाने पळता
येईल तेवढा तो पळत सुटला .
अनेक वेळा तो वाळवंटातल्या भाजत्या वाळूवर कोसळला . जेव्हा त्याच्या पायातली ताकद
नाहीशी झाल्यासारखी होत होती तेव्हा मधून मधून तो सरपटत जात होता . ती दलदलीची वाळू
त्याची वाट पहात राहणार नाही या विचाराने तो पुढे पुढे धावत होता - त्याला आपल्या मित्राला
दावलेच पाहिजे होते .
अगदी गलितगात्र अवस्थेत तो तंबूपाशी पोचला , तंबूची कनात त्याने फाडकन उघडली
आणि घोगऱ्या आवाजात तो पुटपुटला ,
" बायोरला वाचवा , त्यानं मला वाचवलंय . .. ” ।
एवढे बोलून अतिश्रमांमुळे तो बेशुद्ध पडला .
तो मुलगा शुद्धीवर आला तेव्हा सकाळ उजाडली होती . पण त्याच्या शुश्रूषेला अवतीभवती
कुमात्र नव्हते . प्रत्येकजण आपापल्या रोजच्या कामाला निघून गेला होता .
“ बायीर ! " एकदम उठून उभे राहताना त्या मुलाला आठवण झाली . त्याचे पाय लटपटत
होते . डोके गरगरत होते , पण कसाबसा तो तंबूबाहेरच्या मोकळ्या हवेपर्यंत पोचला .
आणि तिथे तंबूबाहेर , बायीर समाधानाने गवताचा घास चघळीत होता .
मुलाला पाहताच त्या म्हाताऱ्या उंटाने चघळणे थांबवले आणि आपले डोके
बाजूला फिरवले . किती मजेदार दिसत होता तो ! त्याच्या तोंडाच्या दोन्ही
बाजूनी गवत डोकावत होते , जणू त्याला मिशा उगवल्यासारख्या दिसत होत्या .
मुरादच्या डोळ्यात समाधानाचे आणि आनंदाचे अश्रू होते .
धनगराचे जीवन
कूलीचे वडील याझखान हे धनगर होते ; आणि त्यांचे वडीलही धनगर होते व त्या
वडिलांचे वडीलही धनगर होते . . .
आपल्या वाकड्या सोट्यावर रेलून एखाद्या वाळवंटातल्या झाडासारखा कूली स्तब्ध उभा
होता . वाळूमध्ये ती एखाकी आकृती एकाद्या उंच सुळक्यासारखी भासत होती . दूरवर
टेकड्यांपलिकडे सायंकाळचा थकलाभागला सूर्य ओठंगला होता . सूर्याने आणि धनगराने एकमेकांना
चांगले समजून घेतले होते . अखेरीस त्यांचे दैनंदिन जीवन सारखेच होते .
कूलीच्या पलिकडे त्याच्या मेंढ्या होत्या . त्या दीड हजार मेंढया वाळवंटातल्या कुरणात
चरत होत्या . एकटा कूली आणि साकार व बासार नांवाचे त्याचे दोन कुत्रे त्या मेंढ्यांची राखण
करीत . सूर्य जरी आता क्षितिजावर मावळला होता तरी आगीत केस जळल्यानंतर येतो तसा
भाजका वास वाळूला अजूनही येत होता .
त्या उन्हाळ्यात कूली सुकून गेला होता आणि रापला होता . पण त्याबद्दल त्याच्या काही
तक्रारी नव्हत्या . ना सूर्याबद्दल , ना वाऱ्याबद्दल , ना वादळाबद्दल त्याची तक्रार होती . त्याचे
जीवनच तसे होते . दात गच्च आवळून धरायचे आणि वाळूच्या व बर्फाच्या वादळांना तोंड द्यायचे ,
मुसळधार वासंतिक पावसाच्या धारा झेलायच्या आणि लांडग्यांच्या भयानक आरोळ्या ऐकायच्या . . .
सकाळी नऊ वाजता कूली आपल्या जनावरांना पाणी पाजायचा ; मग दुपारची ऊन्हे
निवेपर्यंत मेंढ्या , कुत्रे आणि तो विश्रांती घेत गप्प पडून रहात . एकदा का सूर्य दूरच्या टेकड्यांवर
घसरला की , सेर्काच्या गळ्यातली घंटा कळपाला दचकवून एकदम जाग आणायची .
अशा प्रकारे आता कूली त्या घंटेची किणकिण ऐकायची वाट पहात होता . ती वाजायला
लागताच सेर्का कळपाला गोळा करू लागला , कारण आता चांगलेचुंगले खायला मिळणार हे त्याला
माहीत होते . मेंढरे खाणे खायला आली . कूली त्यांच्या पाठोपाठ काही अंतरावर चालत गेला ,
माल्या. याबला आणि आपल्या वाकड्या सोट्यावर रेलून सूर्यास्त पाहू लागला . केशरी सूर्यकिरणांनी
इनमगाराला एकदा शेवटचे डोळे मिचकावून दाखवले आणि विश्रांतीसाठी ती बुडून गेली .
सूर्य विधातीला गेला , पण कूलीचे काम आत्ता कुठे सुरू झाले होते .
" उद्या सकाळी भेटू , " कूली सूर्याला उद्देशून म्हणाला .. .
सबंध दिवसात त्याच्या तोंडून एवढेच शब्द उच्चारले गेले होते .
मैदानावर काळोख पसरत गेला . आणि जेव्हा आकाशालाही त्या काळोखाने वेढले तेव्हा
आलादो चंद्र उगवला . आपल्या भेदक नजरेने त्याने अंधाराला बाजूला सारले आणि उंदरांच्या
बिळावरून त्याच्या सावल्या झरझर पसरत वाळूत वितळून गेल्या .
जेव्हा चंद्र टेकड्यांपासून वर गेला तेव्हा कूलीने मेंढ्यांमधून आपले खेचर बाजूला काढले
आणि त्याच्या गळ्याभोवती घंटा बांधली . ते खेचर त्यांचे जेवण आणि पाणी वाहून आणत असे .
ज्जाल . नात्रीच्या वेळी चुकून ते इकडेतिकडे भटकत राहिले असते , तर कूली आणि इतर जनावरे
नकली व तहानेली राहिली असती .
अखेरीस वाळवंटातली उष्णता निवली आणि थंडीच्या लाटेने वाळवंटाला वेढून टाकले .
चादाण्यात न्हाऊन निघणाऱ्या टेकड्या दुधाळ धूसर भासत होत्या . मैदानात चांदणे एवढे लख्ख
साढले होते की , पायांखालचे वाळूचे कण हिमकणांसारखे चमकत होते .
मंडरे बिनधास्तपणे चरत होती .
कूलीच्या पायाशी बसलेल्या कुत्र्यांनी आपल्या दमलेल्या पंजांवर डोकी टेकली होती . त्यांनी
डोळे मिटून घेतले होते तरी जरासे खुट्ट होताच वान्याने पाने फडफडावीत तसे त्यांचे कान
अस्वस्थपणे थरथरत . सारे काही शांत निवांत भासत होते . त्या रात्री कुणाही लांडग्याला कळपावर
हल्ला करायची हिंमत झाली नसती .
मंड्या चोरायला मोठे कसब लागते . मेंढया कमालीच्या संवेदनाक्षम असतात , भेदरट
असतात . जर लांडग्यांनी सरळ हल्ला चढवला तर त्या पटकन त्यांच्या आधीन होतात . जर
साताको मागून लपतछपत आले तर त्यांना धनगराला तोंड द्यावे लागते . आणि दोन्ही बाजूंनी
कुत्रे राखण करीत असतात - उजवीकडून साकार व डावीकडून बासार .
मंड्या चरत होत्या , कुत्री स्वप्ने पहात होती आणि धनगर उंच आकाशातल्या चंद्राकडे
टक लावून पहात होता . कुठूनतरी हळूच वाऱ्याची झुळूक आली . त्या निस्तब्ध , निवांत ,
चादण्यातल्या देखाव्याला पाहून काळजात हलके हलके वाटत होते .
____ मध्यरात्रीला मेंढ्या चरायच्या थांबल्या आणि थंडगार वाळूवर विश्रांती घ्यायला मोकळ्या
मैदानात एकत्र गोळा झाल्या . कूलीने खेचराच्या पाठीवरून खाण्या-पिण्याच्या जिनसा उतरवून
मोक्ताल्या , अनेक वाळक्या काटक्या मोडून त्यांचा ढीग बनवला आणि शेकोटी पेटवली . मग त्याने
ताच्या च्या किटलीत पाणी ओतले व आगीवर पाणी उकळायला ठेवले . रबराच्या भांड्यात आपल्या
कुञ्यासाठी त्याने थोडे पाणी ठेवले . साकार उठून आपले पाणी प्यायला , बासार तसाच
आमटून पडून राहिला .
शेकोटी छोटी होती तरी तिच्या प्रकाशाने डोळे दिपून जात होते . धनगराने आगीच्या
मणीजवळ पसरलेल्या आपल्या हातांनी डोळ्यांवर आडोसा धरला होता . त्याच्या बधीर शरीरामधून
जाममातेची ऊब हळूहळू पसरत चालली होती . त्याच्या तांब्याच्या तुंच ( चहाचे भांडे ) मध्ये जेव्हा
ico
23
9 .66
ESS
।
Sal
HAN
क्याम्मी उकळले तेव्हा कुलीने चांगला कडक चहा बनवला . कडक चहा चांगली ताकद देतो असे
लल्याचे मत होते .
त्या आगीपासून सुमारे दहा पावले दूर अंतरावर उभे राहून , केसाळ अंगरख्यात गुरफटून
करतातल्या कुली तो गरम चहा पीत होता . आगीजवळ फार काळ बसून राहणे धोक्याचे असते .
सातामाटातले सगळे सरपटणारे प्राणी आगीकडे आकर्षित होतात - वाळवंटातले कोळी , कांगारूसारखे
अशाप्पी. काळे किडे . प्राणघातक विंचू तर सरळ आगीच्या दिशेने चालत येतो आणि त्याची विषारी
लामी डान्ड मारायला नेहमी तयार असते .
नालीने आपले चहाचे पहिले भांडे परत किटलीत ओतले . चहा चांगला मुरायला पाहिजे
होता. .. तो मुरल्यावर त्याने पुन्हा भांड्यात चहा ओतला व नंतर त्याने चहाची अनेक भांडी
पोटात रिचवली . त्यामुळे त्याची थंडी आणि तहान पळाली व त्याच्या नसांमधून ऊबदार रक्त
वाहू लागले .
आगीने शेवटच्या वाळक्या काटक्या लपेटल्या आणि भोवतालच्या इतर सर्व गोष्टींप्रमाणे ती
स्तब्ध झाली . चांदणेसुद्धा मलूल भासू लागले . तारे चमकू लागले , कुत्री भोवती फिरू लागली ,
कळप डुलकी घेत होता .
कूलीने आपला वाकडा सोटा डोक्याखाली घेतला होता . वाकडा सोटा म्हणजे धनगराची
लोखंडी उशी . त्या उशीवर आडवे पडून तो पुन्हा एकदा आकाशाकडे निरखून पाहू लागला .
आकाशात ध्रुव तारा चमकत होता , सप्तर्षि हळूच रात्रीच्या अंधारात चोरपावलांनी येत होते .
पहाटेच्या वेळी ध्रुव ताऱ्याला मागे सारून पूर्वेला शुक्राची चांदणी चमकू लागली असती . आणि
मग टेकड्यांवर सारा नक्षत्रगण चमकू लागला असता .
ताऱ्यांची वाटचाल कशी वाचायची ते कूलीला त्याच्या वडिलांनी शिकवले होते . जरी
लिहीता -वाचता येत नव्हते तरी म्हातान्या याझखानना एखाद्या खगोलशास्त्रज्ञासारखी आकाशाची
माहिती होती . एकदा त्यांनी आपल्या मुलाला सांगितले होते :
“ ऐक माझ्या पोरा , जर वाळवंटात तुला जायचं असेल , तर तुझ्या तळहाताप्रमाणं तुला
ते माहिती पाहिजे . आणि आपल्या पाच बोटांसारखी तुला आकाशाची माहिती असली पाहिजे .
आकाश माहिती असल्याशिवाय तुला वाळवंट समजणार नाही . "
आणि कूली आकाशाशी व वाळवंटाशी नेहमी एकरूप
होऊन राहिला . त्याच्या एकाकी धनगरी जीवनात आकाश आणि वाळवंट त्याचे सतत
साथीदार होते .
тауарларына арналган
ЧА
43
r
сан
ура
ТАНГРЫКУЛИЕВ
ГЛАЗА ЧАБАНА
на языке маратхи
© मराठी अनुवाद , प्रगती प्रकाशन , १९७९
सोविएत संघात मुद्रित
а
о
480301000
та 10802 - 100
014 (01)- 79 866- 79